मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

Rain | अवकाळीचा फटाका, द्राक्ष पंढरीत गारपिटीमुळे द्राक्ष बागा उद्धवस्थ – Marathi News | Damage to grape orchards due to hailstorm in Nashik district, Minister Dada Bhuse inspected marathi news

नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटचा फटका शेतकऱ्यांना बसला Image Credit source: tv9 Marathi

उमेश पारीक, नाशिक, दि. 27 नोव्हेंबर 2023 | राज्यात हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार दोन दिवसांपासून गारपीटसह पाऊस सुरु आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागा उद्धवस्थ झाल्या आहेत. द्राक्ष पंढरीत गारपिटीमुळे द्राक्ष बागांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवादिल झाले आहेत. रविवारी संध्याकाळी नाशिक जिल्ह्यांत तुफान गारपीट झाली होती. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे सोमवारी सकाळीच शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सुट्ट्या असल्या तरी अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करावे, असे आदेश त्यांनी दिले आहेत.

हे वाचलंत का? -  PM Kisan 15th Installment : या तारखेला जमा होणार पीएम किसानचा हप्ता, पण हे काम केले का? - Marathi News | PM Kisan Samman Nidhi scheme 15th installment will be deposited on 30 September 2023, KYC verification

दीड ते दोन लाख रुपये खर्च मदत तुटपुंजी

द्राक्ष बागेला एकरी दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो. मात्र शासनाकडून तुटपुंजी मदत मिळते. यामुळे नुकसानीचे पंचनामे करताना एकरी दीड ते दोन लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील ठेंगोडा गावात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कांदा, सिताफळ, वाल, शेवगा, तुर, मकई पिकाचे नुकसान झाले आहे.

पालकमंत्री दादा भुसे शेतकऱ्यांच्या बांधावर

नाशिकमध्ये काल झालेल्या अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. नाशिक जिल्ह्यांत निफाड तालुक्याला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला. द्राक्ष, डाळिंब, गहू, भाजीपाला पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा आडव्या झाल्या. पावसानंतर द्राक्ष बागांवर आता डावणी रोगाचे संकट निर्माण झाले आहे.

हे वाचलंत का? -  राज्यात अवकाळी, शेतकरी संकटात, अचानक आलेल्या पावसाने शेतीचे नुकसान - Marathi News | Unseasonal rain in many places in Maharashtra, damage to agricultural crops marathi news

हे सुद्धा वाचा



नाशिकच्या ग्रामीण भागांत नुकसान

मालेगाव, मनमाड, चांदवड, नांदगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. परिसरात झालेल्या तुफान गारपीटमुळे शेतात गारांचा खच पडला आहे. त्यामुळे कांदा, गहू यासह रब्बीचे इतर पीक आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यांमुळे झाडे उन्माळून पडली आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


Web Title – Rain | अवकाळीचा फटाका, द्राक्ष पंढरीत गारपिटीमुळे द्राक्ष बागा उद्धवस्थ – Marathi News | Damage to grape orchards due to hailstorm in Nashik district, Minister Dada Bhuse inspected marathi news

हे वाचलंत का? -  डाळिंब बाग वाचवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड, त्याने केलेल्या युक्तीचे होते सर्वत्र कौतुक - Marathi News | Donation of clothing on pomegranate orchards to protect from heat

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj