मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

PM Kisan Yojana : 15 वा हप्ता मिळण्यापूर्वीच या लाभार्थ्यांचे नाव यादीतून होईल गायब – Marathi News | Beneficiaries will be fewer in Pradhan Mantri Kisan Yojana, the names of these farmers will be cut from the list even before getting the installment, and they will not get the benefits of the scheme

नवी दिल्ली | 27 सप्टेंबर 2023 : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत (PM Kisan Yojana 15th Installment) देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना थेट लाभ देण्यात येतो. त्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपये जमा होतात. 2000 रुपयांचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा करण्यात येतो. योजनेच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 14 हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. परंतु अनेकदा काही शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचित रहावे लागले आहे. केवायसी अपडेट न केल्याने अथवा तपशील न दिल्याने शेतकऱ्यांचे नाव योजनेच्या यादीतून बाहेर काढण्यात आले आहे. यावेळी पण अनेक शेतकऱ्यांची नावे यादीत नसतील. कारण तरी काय?

हे काम केले का?

14 वा हप्ता जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांना आता 15 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. आता एक वृत्त समोर येत आहे, त्यानुसार, देशातील अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याविषयीचे कारण पण स्पष्ट झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जमीन नोंदणी विषयीची माहिती, तपशील अद्ययावत न केल्याने अनेक शेतकऱ्यांना या योजनेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. यापूर्वी पण शेतकऱ्यांना या कागदपत्रांची पूर्तता न केल्याने लाभ देण्यात आला नव्हता. ekyc न करणाऱ्या शेतकऱ्यांना केव्हाही यादीतून बाहेर करण्यात येऊ शकते.

हे वाचलंत का? -  शेतकऱ्यांना अवघ्या 2 रुपयांत वीज! निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारची मोठी घोषणा - Marathi News | 24 24 hour electricity for farmers, Jagran will be closed to give water to crops, electricity will be available for just 2 rupees, what is the government's plan Deputy Chief Minister Devendra Fadanavis Announced Scheme

हे सुद्धा वाचा



यामुळे अडकू शकतो पैसा

तुम्ही पीएम किसान योजनेसाठी पात्र असेल तरी हप्ता मिळण्यात तुम्हाला पण अडचण येऊ शकते. तुम्ही जो अर्ज भरला आहे. तो भरताना जर चूक झाली असले तर अडचण येऊ शकते. लिंग, नाव, पत्ता आणि खाते क्रमांक यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक झाली असेल तर योजनेचा हप्ता थांबतो.

असे करा ई-केवायसी

जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर ई-केवायसी करणे आवश्यक आहे. ekyc न केल्यास तुमचा 15 वा हप्ता थांबविण्यात येईल. त्यासाठी तुम्हाला हे काम त्वरीत करावे लागेल. त्यासाठी पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन ते अपडेट करावे लागेल. तसेच CSC केंद्रावर जाऊन ही माहिती अपडेट करता येईल. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास योजनेचा हप्ता जमा होणार नाही.

हे वाचलंत का? -  मुंबईकरांनो! यादी आली; म्हाडा लॉटरीच्या अर्जदारांची अंतिम यादी प्रसिद्ध..!

योजनेत किती मिळेत रक्कम


पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत प्रत्येक वर्षी शेतकऱ्याला 6 हजार रुपये देण्यात येतात. ही रक्कम शेतकऱ्यांना शेतीसंबंधीच्या कामासाठी उपयोगी ठरते. त्याला बी-बियाणे खरेदी करताना, मशागतीसाठी ही रक्कम कामी येते. तीन टप्प्यात ही रक्कम देण्यात येते. प्रत्येक हप्त्यात चार महिन्यांचे अंतर असते.

हे वाचलंत का? -  शेतकऱ्याची कमाल, लाल नव्हे पांढऱ्या स्ट्रॉबेरेची शेती केली, पाहा काय आहे यात खास - Marathi News | The farmer farmed white strawberries, not red, so look what's special


Web Title – PM Kisan Yojana : 15 वा हप्ता मिळण्यापूर्वीच या लाभार्थ्यांचे नाव यादीतून होईल गायब – Marathi News | Beneficiaries will be fewer in Pradhan Mantri Kisan Yojana, the names of these farmers will be cut from the list even before getting the installment, and they will not get the benefits of the scheme

Leave a Comment

Close Visit Havaman Andaj