खरंतर राज्यातील शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे पुरता हवालदिन झालेला असताना नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी आपल्या प्रयोगाकडे आणि नियोजन बद्ध शेतीमुळे सुखावला आहे.

Image Credit source: TV9 Network
नाशिक : खरंतर राज्यातील शेतकरी हा कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकटामुळे पुरता हवालदिल झालेला असतो. मात्र, हे संकट आलेले असतांना त्यातूनही आपला शेतमाल वाचवून दोन पैसे मिळवतो तोच शेतकरी समाधानी होत असतो. असेच कसब सध्या खान्देशातील केली उत्पादक शेतकऱ्यांना आलं आहे. उत्तर महाराष्ट्र केळी उत्पादनाचा हब म्हणून ओळखला जातो. उत्तर महाराष्ट्रातील केळी ही देशापुरती मर्यादित नाहीतर सातासमुद्रापार पोहचळी आहे. गुणवत्तापूर्ण आणि टिकाऊ असलेल्या केळीला विविध देशांतून मागणी आहे. मुंबईतून जहाजाने दुबईला पाठविली जातात. तेथून ती इराक, इराण, ओमेन यांसह दहा ते बारा देशांत केळी पिकाची निर्यात होते आहे.
Web Title – खान्देशातील केळीचा विदेशात डंका, संकट काळातही शोधलं यशस्वी होण्याचं कसब, जाणून घ्या – nandurbar news Even during the crisis, the farmer has exported the best type of banana crop to foreign countries
