कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नाशिकच्या निफाड तालुक्यात केलेल्या अंधारातील पाहणी दौऱ्याची जोरदार चर्चा होत आहे. त्यावरुन शेतकरी नाराजी व्यक्त करत आहे.

Image Credit source: Google
नाशिक : मागील सलग दोन आठवड्यात अवकाळी पाऊसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याची स्थिती आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारकडे भरपाई करून देण्याची मागणी शेतकरी करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे त्या ठिकाणी पाहणी दौरा करत आहे. मात्र, त्यांचा नाशिक दौरा चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामध्ये अब्दुल सत्तार ज्या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घ्यायला गेले होते त्याच शेतकऱ्यांना सरकारने सहा महिण्यात शेतकऱ्यांना मदत कशी केली हे पटवून सांगत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Web Title – रात्रीच्या अंधारात शेतीचं नुकसान दिसणार आहे का? अब्दुल सत्तार यांनी पाहणी केली की चेष्टा? शेतकऱ्यांचं म्हणणं काय? – nashik news abdul sattar inspected nashik farmers damaged crops in night making farmers unhappy
