कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे नुकसानग्रस्त भागात शेतीची पाहणी दौऱ्यावर आहेत. त्या दरम्यान नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केल्याने दौरा अधिकच चर्चेचा विषय ठरत आहे.

Image Credit source: TV9 Network
नाशिक : सलग दोन आठवडे राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून भरपाईची मागणी केली जात आहे. त्यामध्ये चार महिन्यांपूर्वी सोयाबीनचे नुकसान झाले ट्याची नुकसान भरपाई अजून मिळाली नसल्याने शेतकरी संतापलेले होते. त्यातच कृषीमंत्र्यांचा दुपारचा दौरा हा तब्बल तीन तास उशिरा झाला त्यामुळे ताटकळत बसलेले शेतकरी अधिकच आक्रमक झाले होते. त्यात नाशिकच्या निफाड येथील शेतकऱ्यांनी अब्दुल सत्तार याची चांगलीच कोंडी केल्याचे पाहायला मिळाले. त्यातच अब्दुल सत्तार अवघ्या काही मिनिटांत पाहणी करून चहा पिऊन गेल्याने उलट सुलट चर्चा होऊ लागली आहे.
Web Title – अहो साहेब द्राक्षांऐवजी गांजाची शेती करू द्या… दौऱ्यावर आलेल्या अब्दुल सत्तारांकडे केली अजब मागणी, नेमकं काय घडलं – nashik news Agriculture Minister Abdul Sattar came to inspect damaged farms and left after drinking tea within five minutes
