सर्वात मोठे नुकसान झाले ते भाजीपाला पिकाचे. वीज पडून शेतकरी दगावल्याची माहिती आहे. हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले.
भंडारा : भंडारा-गोंदिया जिल्ह्यात वादळी पावसाचा चांगलाच फटका बसला. यात सर्वात मोठे नुकसान झाले ते भाजीपाला पिकाचे. वीज पडून शेतकरी दगावल्याची माहिती आहे. हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले. सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. त्यामुळे आता उद्यापासून नुकसानीचे पंचनामे सुरू होणार काय, असा सवाल शेतकरी विचारत आहेत. पंचनामे करून त्वरित मदत द्यावी. पंचनामे सुरू करण्यासाठी आणखी किती दिवस लागणार, असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे.
Web Title – वादळी वाऱ्याचा भाजीपाला पिकाला फटका, वीज पडून इतके शेतकरी दगावले; किती हेक्टरचे नुकसान? – East Vidarbha hit by unseasonal rains
