आधीच अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांना मोठा दणका बसलेला असतांना आता पुन्हा शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट उभं राहण्याची शक्यता आहे.

Image Credit source: Google
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांसमोर ( Farmer News ) येईल संकटाची मालिका सुरूच आहे. आता पुन्हा एकदा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलेला अंदाज शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवणारा ठरणार आहे. नुकतेच ढगाळ हवामानामुळे आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास ही निघून गेल्याची भावना शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे आणि आता पुन्हा एकदा अवकाळी पाऊस होईल अशी शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. पुढील पाच दिवस अवकाळी पाऊस होण्याची शक्यता असल्याने कांदा उत्पादक शेतकरी, द्राक्ष बागायतदार आणि भाजीपाला उत्पादक यांची अधिक अडचण निर्माण झाली आहे.
Web Title – शेतकऱ्यांची चिंता वाढली! पुढील पाच दिवस शेतकऱ्यांसाठी महत्वाचे, शेतकऱ्यांवर कोणतं संकट ? – Farmers in the state are worried. It is likely to rain in the next five days. This has increased the anxiety
